7.30.2019

आपल्या परिसरातील विदेशी झाडे आणि देशी झाडांचे महत्व (Importance of Trees)

आपल्या परिसरातील  विदेशी झाडे 
आणि देशी झाडांचे महत्व 

उन्हाळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गुलमोहर नेहमी आपल्याला आपला वाटतो. वस्तीव्क पहाता हा वृक्ष मादागास्कर येथून भारतात आला आहे.  भारतभर आढळणारे  निलगिरी, १९७२ साली ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणले. युरोप मधून आयात केलेल्या धान्या बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवरआपले वर्चस्व  जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे .




  निलगिरीचे झाड 
गाजरगवत अर्थात पार्थेनियम तण किंवा आपण त्याला  आणि काँग्रेस गवत म्हणतो हे हानिकारक तण दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे  गव्हाबरोबर आले. हे तण इतके माजले की त्याचा बंदोबस्त करणे मुश्कील झाले.
 व ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .

अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचेdदिसून येते.
 या झाडांच्या फुलात परागकण नसल्यामुळे  त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे ..या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत . या विदेशी झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही ... रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे.  ही विदेशी झाडे इतकी निरुपयोगी आहेत की त्याला आपल्याकडे असलेली  गाय ,बैल ,शेळीसुद्धा त्यांना खाण्यासाठी तोंड लावत नाहीत .निसर्गात वावरणाऱ्या प्राण्यांना ही यांच्या मुले धोका निर्माण झाला आहे. अशा निरुपयोगी झाडामुळे अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे असे अनेक प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत .
आपण सगळे डोंगर व मानवनिर्मित जंगले पहातो ती सगळी ग्लिरिसिडीया या विषारी झाडांनी भरलेली दिसतात.  या  झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी ते अपंग होतात ... मरतात ...या झाडाखालुन चालताना धाप लागते ... या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जात. 
१९७०च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.
 परदेशी  झाडाच्या पानाचा धुर, वास, अथवा पराग कनामुळे अनेकांना अलर्जी झाल्याचे आढळून आले आहे. या  शरीर सुजने,  शिंका येणे,मळमळ होणे, दमा  इत्यादी त्रास उद्भवतात.
परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत. या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत.

 देशी झाडेचे महत्व

 आपल्याकडे पुरातन काळापासून अनेक वृक्ष आपले महत्व टिकून आहेत. कारण ते इथेच रुजतात आणि मानवाला कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाढतात. हे वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्य बरोबरच पक्षी-प्राणी यांसाठी वरदान ठरतात. या झाडांच्या बरोबर अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. 
पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढण्यास  मदत होते. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत या झाडांच्या मुळ्या खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते . ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे .
सुगरण पक्ष्याचे घरटे 
 देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, , सीताफळ, रामफळ अशी साधारणपणे  ३५० पेक्षा जास्त जातीची झाडांचे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात.   
बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कडुनिंब ,मोह, पळस शिसव, पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज,कवठ, बेल,  ही झाडे आदी स्थानिक झाडांची लागवड करणे गरजेचे असताना. जी झाडे आपली नाहीत, जी झाडे हिरवी दिस्तात्त, खूप मोठ्या प्रमाणावर पाणी शोसतात, आणि प्राणी पक्षांना निराधार ठरतात त्या झाडांचा लोक अवलंब करीत आहेत. अशा लोकांनी वेळीच देशी वाणाची माहिती जाणून घ्यावी. अन्यथा आज जेवढी  जैवविविधता अस्तित्वात आहे ती आपल्याला भविष्यात दिसेल कि नाही सांगता येणार नाही. 

आपण कोणते झाड लावावे, त्याचे काय फायदे आहेत व झाड लावणाऱ्याला कोणते फल मिळणार याचे विवेचन करणारा एक सुंदर श्लोक आहे. तो खालील प्रमाणे.

  अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
 कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।

अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही.
 हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे ... वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय .



सौजन्य वन्यजीव प्रेमी whatsapp.

1 Comments:

At 18 January 2021 at 07:22 , Blogger Hrishikesh Tamhane said...

खरंच खूप सुंदर माहिती
विदेशी झाड किती धोकादायक आहेत पर्यावरणाला हे खूप सुंदर सांगितलंत💯✌🏻

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home