8.21.2019

संकटाची चाहूल देणारा प्राणी

संकटाची चाहूल देणारा प्राणी


कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून घर-घरात पाळला जातो. ग्रामीण भागात कुत्रा हा अत्यंत महत्वाचा प्राणी मानला जातो. कारण तो घराची व शेताची राखण करतो. म्हणून कुत्रा हा शेतकऱ्याचा भरोसेमंद साथीदार व इमानदार प्राणी समजले जाते. चोर किंवा अनोळखी  माणसाला तो आपल्या घराच्या परिसरात येऊ देत नाही. तो भुंकून भुंकून आपल्या धन्याला सावध करण्याचा प्रयत्न करो. पण कधी कधी गावातील सर्व कुत्री एकसाथ मोठमोठ्यने ओरडायला लागतात. ते का ओरडतात हे कारण कोणाला पक्के माहित नसते. पण जेव्हा जेव्हा  म्हणून  ते ओरडतात तेव्हा लोक त्या कुत्र्यांना मारतात. हाकलून लावतात.  काहीतरी अशुभ घडेल म्हणून ही मारतात. जेव्हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो त्यावेळी ही हे कुत्रे ओरडतात. परंतुkकुत्र्यांचे ओरडणे हि कुठल्या तरी धोक्याची सूचना असते. असे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.  कोल्हापूर मधील आंबेवाडी या गावातील लोकांनी या कुत्र्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. साहजिक आहे , यांच्या प्रजननाचा काळ आहे म्हणून काही कुत्री ओरडत असतील. पण यावेळी सगळेच कुत्री ओरडत होती. यावेळी कोणी लक्ष नाही दिले.
                   ते सगळे कुत्रे ओरडून रात्रीच ते गाव सोडून निघून गेले. लोकांना प्रश्न पडला हे सगळे कुत्रे गेले कुठे असतील. मग जेव्हा गाववाले सकाळी उठले तर पाहतात तर नदीचा पूर त्यांच्या घरात शिरला आहे.. नदीला महापूर आला आहे. पुढच्या 10 दिवसांनी ते पूर निघून गेल्यावर, ती कुत्री परत आले.
हे  पाहून सगळे गावकरी अचंबित झाले. तेव्हा समजले हे कुत्री का ओरडत होते .
येणाऱ्या संकटाची चाहूल आधी मुक्या प्राण्यांना लागते. व ते आपल्याला अनेक प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या हालचालीकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा त्याची किमत माणसाला मोजावी लागे. कारण या निसर्गात  प्रत्येक कण , प्रत्येक जीव एकमेकांशी जोडला आहे.tत्याचे मोल जाणून घ्या. 

                  

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home