3.02.2023

मधुमेहींसाठी

 *जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी आहे* 


जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे.

पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. TOI च्या बातमीनुसार, जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा पोटात गेल्यावर अन्नाचे तुकडे होतात. यानंतर शरीर या अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेते.

अन्नाच्या महत्त्वाच्या भागाचे पचन लहान आतड्यात होते. संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न पोटात गेल्यावर खूप लवकर आतड्यात पोहोचते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. याशिवाय चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. चालणे हे कार्डिओ व्यायामासारखेच आहे.

यामुळे संपूर्ण शरीरात हालचाल होते जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Walking after meal) असते. चालल्याने पचनक्रिया गतिमान होते जेवणानंतर चालण्याने पचनक्रिया गतिमान होते, अन्न जितक्या वेगाने पोटातून लहान आतड्यात जाते, तितक्या लवकर तुम्हाला ब्लोटिंग, गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या सामान्य समस्यांपासून आराम मिळेल. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवणानंतर नियमित 30 मिनिटे चालण्याने आतड्यांचे कार्य सुधारते, तसेच बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.


मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर :

संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर चालणे केवळ पचन सुधारत नाही तर टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांना देखील फायदा होतो. न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातील संशोधकांच्या मते, जेवणानंतर ग्लुकोजची पातळी वाढते. या ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीला नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन स्रावित केले जाते. परंतु, टाइप-2 शुगर असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. म्हणून, जेव्हा तो अन्न खाल्ल्यानंतर चालतो तेव्हा बहुतेक ग्लुकोज शरीरात उर्जेच्या स्वरूपात खर्च होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. संशोधनात असेही म्हटले आहे की, जे लोक जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खातात त्यांनी जेवल्यानंतर नक्कीच चालावे, खाल्ल्यानंतर चालण्याने शरीरातील क्रियाकलापांसाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला जातो. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास त्यामुळं मदत होते.

Labels:

3.01.2023

विज्ञान

 *❤️ राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!❤️*

विज्ञान सांगतं - 

❣️ विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं 

❣️ ते कारण आपल्या मानवी बुद्धीला समजू शकतं 

❣️सर्व कारणं आजच समजतील असं नाही पण जेव्हा केव्हा समजतील त्यावेळी विज्ञानाच्या नियमानेच समजतील.

❣️ही कारणं समजल्यावर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विकासासाठी, काही समस्या दूर करण्यासाठी करून घेता येतो.

❣️ हजारो वर्षे अनुत्तरित असणारे प्रश्न आधुनिक विज्ञानाने सोडवले आहेत. 

❣️ याचा अर्थ सर्वच प्रश्न सुटले आहेत असे नाही पण आज अनुत्तरित असणारे प्रश्न ही विज्ञानाच्या आधारेच सोडवता येणार आहेत. 

❣️ विज्ञान स्वतः काही चागलं किंवा वाईट ठरवत नाही. विज्ञान जे आहे ते, जसं आहे तसं आपल्यासमोर मांडतं.

❣️ शाळा महाविद्यालयांतून निबंध, भाषण स्पर्धेसाठी दिला जाणारा विज्ञान शाप की वरदान हा विषयच चूक आहे. विज्ञान हे वरदानच आहे. ते कधीच शाप असू शकत नाही. 

❣️ विज्ञान वापरणाऱ्याच्या विवेकावर आपण विज्ञानाला शाप किंवा वरदान ठरवत असतो. शाप किंवा वरदान हा विज्ञानाचा गुण नसून वापरणाऱ्याचा आहे.

❣️  विज्ञान संपल्यावर अध्यात्म सुरू होते ही समाजाने जोपासलेली एक गोंडस अंधश्रद्धा आहे. उलट जिथे अध्यात्म थांबतं तिथून विज्ञान सुरू होतं असं म्हणता येऊ शकतं.

❣️  विज्ञान हे अध्यात्माप्रमाणे मला सर्व समजतं किंवा समजलेलं आहे असं म्हणत नाही. 

❣️ आजपर्यंतच्या ज्ञानाच्या आधारे मला एवढं समजलेला आहे असं विज्ञान म्हणतं. अजून न समजलेल्या अनेक गोष्टी आहेत हे विज्ञान नम्रपणे मान्य करतं. 

❣️  न समजलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी विज्ञान नेहमी नवनवीन ज्ञानाच्या शोधात असतं. 

❣️ विज्ञान आपल्याला निर्भय, समग्र आणि व्यापक विचार करायला शिकवतं. 

❣️  निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग हे विज्ञानाचे सत्य शोधण्याचे मार्ग आहेत.

❣️  अलीकडे विज्ञानाचा वापर करून अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे (फलज्योतिष, वास्तुज्योतिष  वगैरे वगैरे) प्रकार सुरू आहेत त्यापासून सावध राहिलं पाहिजे.

*❤️ राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!❤️*