12.05.2019

चहा – अमृततुल्य की विषवल्ली


चहा – अमृततुल्य की विषवल्ली
लेखक – प्रा. डॉ. विधिन कांबळे, सांगोला महाविद्यालय, सांगोला 

इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले आणि सर्व भारतीयांना गुलाम केले.  हे विष सुद्धा आपण पचवले.  इंग्रजानी साधारणतः दोनशे ते दीडशे आपल्या देशात आगमन केले. तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर चहा नावाचे गोड सोबत आणले होते.  ते विष आजही इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीचे प्रतिक आपण घोट-घोट पीत आहोत. आता तर चहा पिणे इतके प्रतिष्ठेचे झाले आहे की, एखाद्याला चहा न पाजणे अपमान वाटतो. शहराबरोबरच खेडेगावातही चहाची थाटलेली दुकाने पहावयास मिळतात. चहा हे सर्वांचेच आवडते पेय झाले आहे. अगदी एक-दीड  वर्षाच्या मुलापासून ते जर्जर वृध्दापर्यंत सर्वानाच चहा पिणे आवडते. पाहुणचार म्हणून चहाला विशेस महत्व आहे. परंतु विनाकारण दिवसातून ४-५ कप ढोसणारे महाभाग काही कमी नाहीत. काही लोक तर भूक मारण्यासाठी चहा पिताना आढळून येतात. चहा पिल्यामुळे मेंदूला तात्पुरती तरतरी येते व ताजेतवाने वाटते. त्यामुळेच वरवर चहा पिल्यामुळे चहाचे व्यसन जडते.
एक काळ असा होता की, नाक्यावरच्या एखाद्या कोपऱ्यावर अंधुक दिवा असलेली चहाची टपरी अथवा मोडकळीस आलेला चहाचा गाडा एस. टी. चुकलेल्या वाटसरूसाठी आधार देण्याबरोबरच प्रवासातील थकवा घालवण्याचे अत्यंत प्रभावी साधन होते. परंतु आज अनेक शहरामध्ये चौका-चौकात अमृततुल्य समजल्या जाणाऱ्या चहाचे फलक लावून विद्युत रोषणाईने सजलेली दुकाने लोकांना आकर्षित करीत असतात व गरज नसताना ‘गोड विषाचा’ कप घशाखाली रिचवण्यासाठी भाग पडतात. हल्ली आफिसमधून बाहेर पडलेले चाकरमान्यासाठी चहाची दुकाने संवादाची केंद्र बनलेली आहेत. गप्पा मारत गरम चहाचे कप आपल्या घशात ओतत असतात.
चहामध्ये मेंदूला उत्तेजित करणारे टॅनिन, कॅफिन इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर असतात. चहामध्ये घातलेली साखर शरीरात त्वरित उर्जा निर्माण करते. व्यक्तीला ताण-तणाव दूर झाल्यासारखे वाटते. त्यामुळे लोक चहा आवडीने पितात व मादक किंवा अमलीपदार्थासारखे चहाचे व्यसन जडते. अमलीपदार्थांचा कैफ बराच काळ टिकतो तसे चहाने सुद्धा तात्पुरती तरतरी येते व व्यक्ती थोड्या वेळासाठी ताजातवाना होतो.चहामध्ये कॅफिन हा घटक मोठ्या प्रमाणावर आढळतो. मेलबर्नमधील डिकिन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असणाऱ्या कॅफिनचा गुणधर्म हा त्या पदार्थाची चटक व व्यसन लावण्यासाठी केला जातो असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळेच चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे चहाची चटक लागते  व चहाचे व्यसन जडते. चहा पिण्याचे तात्पुरते फायदे कमी आणि शारीरिक नुकसान जास्त होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
साखरयुक्त चहाच्या एका कापत जेवढी साखर असते त्यापासून ४० ते ४५ कॅलरीज आपल्या शरीराला मिळतात. दिवसात ४ ते ५ कप चहा घेणाऱ्या व्यक्तींनी याचा विचार करावयास हवा. चहाबरोबर ब्रेड , टोस्ट, बिस्कीट इत्यादी पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलरिजची आणखी भर पडते. त्याचा अनिष्ठ परिणाम म्हणून रक्तदाब, वजन वाढणे, हृदयाची धडधड वाढणे, किडनीवर जास्त दबाव येतो, चरबी वाढते, मधुमेह अशा आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे खूप चहा पिणाऱ्या क्तींनी याचा विचार जरूर करावा. अतिरिक्त साखरेमुळे शरीरात अनेक आजार बळावतात. आपल्या शरीरात जादा साखरेचे रुपांतर चरबीमध्ये होते व लठ्ठपणा वाढण्याचे साखर हे महत्वाचे कारण आहे. अतिरक्त साखरेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते व वाढलेल्या साखरेला नियंत्रित करतना स्वादुपिंड निकामी होते यालाच आपण मधुमेह किंवा डायबेटीस असे म्हणतो.  चहामुळे तोंड येणे, पचनक्रिया बिघडणे, भूक मंदावते, शरीराची उष्णता वाढते. त्याच बरोबर कफ व पित्ताचे प्रमाणही वाढते. अति चहा पिणे हे निद्रानाश, मळमळ, डोकेदुखी चिडचिड, मानसिक त्रास इत्यादीला कारणीभूत ठरते. खरं तर भारत देश हा समशीतोष्ण प्रदेश असल्यामुळे पाश्चिमात्य देशाप्रमाणे आपल्याला चहा पिण्याची गरजच नाही. मधुमेही, हृद्य विकार असलेल्या व्यक्तीं आणि लठ्ठ  व्यक्तींनी चहापासून दूर राहिलेलेच बरे. डॊ. हेरल्ड आणि आर. जे. किस्ट या शास्त्रज्ञांनी कॅफिन वर अनेक प्रयोग केले. त्यांच्या म्हणण्यानुसार कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक अठरा वर्षा खालील व्यक्तीस विकू नये.इतके अन्सिष्ट परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे भारतातील समान्य माणसांनी कॅफिनपासून दूर रहाण्यातच हित आहे.
खूप चहा प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम शोषून घेतले जाते. शरीरात कॅल्शियम वाढीसाठी औषध घेणाऱ्यानी कॅल्शियमची गोळी व चहा एकत्र घेऊ नये.
एकूनच काय, चहा आपल्या शरीराची मरगळ घालवून तरतरी आणणारा असला तरी चहाशौकीन मंडळीनी वरील बाबी लक्षात घेतल्यास चहाला ‘अमृततुल्य’ समजायचे की ‘विषवल्ली’ ठरवायचे हे समजून येईल. या लेखाचा उद्देश लोकामध्ये जागृती निर्माण व्हावी असा आहे.  

आह्रातील साखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे परिणाम

हारातील साखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे  परिणाम

साखर हा शरीरासाठी सर्वात उपयोगी पदार्थांपैकी एक मानला जातो. कारण साखर पचनामध्ये सहाय्य करते, आपल्या शरीराला ऊर्जा पुरवते. पण असे असले तरी अति साखरेचे दुष्परिणामही दिसून येतात.
साखरेच्या अतिसेवनामुळे चरबी वाढते, लठ्ठपणा, मधुमेह आणि डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.
*तर मंडळी या साखरेच्या अतिसेवनाला सर्वात जास्त कारणीभूत आहे चहा आणि नंतर इतर गोड गोष्टी आल्याच.*
दिवसभरामध्ये आपण कितीतरी वेळा चहा पितो तसेच वेगवेगळे गोड पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते. परिणामी आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. शेवटी नाईलाजाने आपण साखर खाणे पूर्णपणे बंद करतो.
पण मित्रहो तुम्हाला माहित साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो आहे का? चला जाणून घेऊ या!
१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृद्य हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. साखर कमी केल्याने तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.
तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.
३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.
४.  साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.
*५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.*
६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.
*साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.*
७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.
साखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.
८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.
९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, कारण साखर ही पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.
१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधे दुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहापासून सुटकारा मिळू शकतो.